Saturday, October 10, 2020

मराठीचा पोपट मेलाय.नेत्यांना खरच मराठी भाषा किंवा अस्मितेबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का ?

संकुचितपणा आणि उदारता या दोन्हीचीही मर्यादा असते ,जरा जरी प्रमाण इकडे तिकडे झाले की सगळे नासते किंवा त्याच विदृपीकरण होत .तेच आज मराठी माणसाला भोगाव लागत आहे भाषेकडे आणि आपल्या मराठी संस्कृती कडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन, फाजील ,निकृष्ट आणि जागतिकीकरणाचा अविर्भाव यांचा सर्वोच्च टप्पा मराठी माणसाने पार केलाय ,आणि तो ही इतरांच्या हातचे बाहुले बनत.नुसता वैभवशाली इतिहास असणे निरर्थक ठरते जर माणसाच्या चेतना आणि स्वाभिमान मुर्दाड झालेला असेल तर ,अस बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत.मराठी आणि महाराष्ट्र वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवर अधू का झाला त्यावर मी नंतर लिहीन ,पण आज जे नेते मराठी अस्मितेचा आव आणून कस "गिधाड "प्रवृत्तीच प्रदर्शन करत आहेत त्याच्याकडे नेहमीसारख "जातीने "लक्ष घाला आणि ते जर जमत नसेल तर जेवढ लक्ष जातीत घालता तेवढच मातीत घाला ,निदान एवढ जरी महाराष्ट्रासाठी केल असतना तर आपल्याच मातीत ,आपल्याच राज्यात आपल्याच अस्तित्वासाठी ,भाषेसाठी झगडाव लागल नसत.

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...