ज्ञानेश्वर मोरे.
9623480172
जग वेगाने प्रगती करत होत ,कच्चा माल आणि मजूर आणि त्यापेक्षाही आवश्यक अशी एक बाजारपेठ जेथे आपले उत्पादन विकल्या जाईल यासाठी सर्व विकसनशील देश शोध घेत होते ते मुर्दाड आणि स्वार्थी वृत्ती असलेल्या लोकांचा देश आणि सोबतच भ्रष्ट राजकारणी आणि निकृष्ट प्रशासन,हेच इंग्रज लोकांनी हेरुन सुमारे 150 वर्षे राज्य केले आणि गेले सुद्धा.पण जे भांडवल आणि कच्चा माल स्थानिक जनतेच्या रूपात उपलब्ध होता त्याचा वापर कोणीतरी करायला नको का?मानव (माणूस)हा मुळातच हिंसा आणि हिस्सा प्रिय माणूस आहे हे मानसशास्त्र आणि मानववंशशास्त्र स्पष्ट करते.मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था अश्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्या समोर आणून आपली "गांधारी लूट"चालू आहे.
क्षितिज ही एक कल्पना आहे त्या मागे पळू नका असं सांगून त्याचा पाठलाग करणाऱ्या माणसाला वेड ठरवलं जातं.पण एक गोष्ट नक्की आहे की तो वेडा नसून वेगळा असतो,आपली सामाजिक आणि राजकीय भूमिका आपण एकच चष्मा लावून पाहत असतो,त्यामुळे राजकीय नेते आणि अधिकारी बिनधास्त पणे गुन्हेगारी आणि भ्रस्टाचार करून मोकळे होतात ते फक्त त्यांच्या "गांधारी आणि धूर्त-राष्ट्र समर्थकांमुळेच "(समजून सुद्धा न समजल्यासारखे करणारे).
आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ, 1960 पासून याची प्रत्यक्ष सुरुवात झाली अफगाणिस्तान येथून आलेल्या काही लोक्कांनी "बॉम्बे"येथे जम बसवला ,मुंबईचे सौन्दर्य आणि भविष्य लक्षात घेऊन सुरुवातीला छोटे छोटे अवैध्य काम करून आपले साम्राज्य पसरवयाला सुरुवात केली आणि मग बघता बघता सारी मुंबईच गिळली.यामध्ये प्रामुख्याने करीम लाला ,हाजी मस्तान,आणि वरदा मुदलियार हे होते.राम मंदिराची मागणी नेमकीच जोर धरू लागली ,1947 नंतर पहिल्यांदाच लोकांच्या अश्या धार्मिक आणि संप्रदाइक मागण्या जोर धरू लागल्या मग त्यामध्ये ,तामिळ लोकांसाठी विशेष राज्य त्यासाठी ltte(प्रभाकरन)कार्यरत होती ,तिकडे पंजाब मध्ये सुद्धा "खलीस्थान चळवळ "जोर धरत होती.प्रचंड अस्थिर आणि तणावपूर्ण वातावरण देश त्याकाळी अनुभवत होता,असा विचारही त्याकाळी कोणी केला नसेल की ह्याच सर्व मागण्या एक दिवस देशाचं राजकारण आणि समाजकारण बदलून टाकतील आणि देशाला नरसंहार ,राजकीय नेत्यांच्या हत्या ,दहशदवाद,आणि civil war,असे काही शब्द परिचित करून देतील,त्यामुळे ह्या तीन घटना भारताच्या आधुनिक राजकारणाचा पाया किंवा भारतीय राजकारणाला कलाटणी देण्यासाठी महत्वाच्या ठरल्या. (2)1977 मध्ये इंदिरा बाईंना जोरदार झटका बसला त्यामुळे त्यांना एक गोष्ट नक्कीच कळली होती की पारंपरिक राजकारण बदलून काहीतरी नवीन आणि मानवी रस असलेले मुद्दे समोर करायला हवेत ,मतदारांची बदलती मानसिकता त्यांनी नेमकी हेरली आणि व्यक्तीकेंद्री राजकारण थोडं बाजूला सारून,राजकारनाचे "व्यावसायिक प्रयोग"त्या करू लागल्या,त्यामध्ये प्रामुख्याने एखाद्या राजकीय आणि भौगोलीक वादाला "राष्ट्रीय अस्मिता"घोषित करणे ,पक्षावर आणि अंतर्गत विरोधक यांच्यावर दबाव आणि वर्चस्व राखने आणि बरेच काही जे आपण आज सुद्धा अनुभवतो.(3)त्याच वेळी तत्कालीन विरोधकांनी सुद्धा आपल्या राजकारण करण्याच्या पद्धतीत बदल केले त्यामध्ये प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर चा मुद्दा ,राम मंदिर ,धार्मिक ध्रुवीकरण ,बहुसंख्य आणि अल्पसंख्य, आणि राष्ट्रीय अस्मिता हे मुद्दे होते.आता या बदललेल्या राजकारण पद्धती भारतीय मतदार आणि नागरिक यांच्यावर "बाळ -संस्कार" टाकण्याचे काम करत होत्या. (4)
मुंबईच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या पोलीस खात्यात हस्तक्षेप करण्याची सुरुवात ही 1980 पासून झाली
तत्कालीन काँग्रेस चे नेते शरद पवार "वसंतदादांच्या"पाठीत खंजीर खुपसून आजच्या लुडो सारखा तेव्हा "पुलोद"नावाचा खेळ केला होता,तो खेळ काही काळानंतर फसला.(5)काळा पैसा गोरा करण्यासाठी तेव्हा एवढी साधन नसायची आणि मुंबई मधील गुन्हेगार सुद्धा एवढी नावारूपाला आलेली नव्हती किंवा टोळी युद्ध सुरु झाले नव्हते.आपल्या राजकीय आणि वयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारांचा वापर तेव्हाचे राजकारणी करायचे ,मुंबईचे अधोविश्व दोन पवारांशिवाय पूर्ण होत नाही एक म्हणजे supercop y,c पवार जे गुन्हेगाराचे काळ होते आणि दुसरे म्हणजे शरद पवार ज्यांचे दाऊद पासून ते इकबाल मिर्ची पर्यंत समंध होते. (पवार त्याचे खंडन करतात)
हवाला किंग म्हणून प्रसिद्ध असलेले इकबाल मिर्ची ,मुकुलचन्द शहा ,चोक्सी ,जे की फरार आरोपी आणि दहशदवादी दाऊद इब्राहिम याचे जवळचे सहकारी आहेत,यांच्यासोबत कोटींचे व्यवहार शरद पवार ,प्रफुल पटेल आणि भारतातील नामांकित नेते यांचे झालेले आहेत.डिसेंबर 1979 ते ऑक्टोबर 1992 पर्यंत शरद पवारांनी प्रत्यक्ष मुकुलचंद शहा याच्यासोबत जवळपास 80 कोटींचा व्यवहार झालेला आहे.सोनिया गांधी यांचे निकटवर्तिय अहमद पटेल हे सुद्धा या संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी होते आणि लतीफ नावाच्या एका कुख्यात गुन्हेगारासोबत त्यांचे संबंध होते.(6)(गुजरात मधील अनेक नेते आहेत)(संदर्भ-vohara committee report)
थोडक्यात काय तर 1978 ते 1980 दरम्यान जेव्हा पवार मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी गुन्हेगारांना मोकळ रान देऊन स्वतःच हीत साधून घेतलं,येणाऱ्या भविष्यात हेच पाळलेले लोक कुख्यात गुन्हेगार आणि दहशतवादी होतील असे पवारांना वाटले नसावे का ?की पवारांना आपला राजकीय आणि खासगी मोह आवरता आला नाही?मुकुलचंद शहा हा कोणी लहान सहान आरोपी नव्हता ,त्यांने मुंबईचा कट रचण्यासाठी टायगर मेमनला (mastermind of mumbai serial blast)2.5 अडीच कोटीची मदत दिली होती,त्याला जेव्हा 1993 च्या स्फोटानंतर पकडले तेव्हा त्यांने सांगितले होते की 1992 च्या ऑक्टोबर पर्यंत पवार माझ्या संर्पकात होते आणि त्यांचा शेवटचा व्यवहार सुद्धा झाला होता जो की तब्बल 7 कोटींचा होता.(संदर्भ -वोहरा समिती अहवाल) (7)पवारांनी बांधलेल्या पायावर इमारत बांधू देण्यासाठी मदत केली
ती तत्कालीन मुख्यमंत्री आणि इंदिरा गांधी यांचे निकटवर्तिय ,आपली पकड पक्ष आणि प्रशासन या दोन्हीवर सुद्धा असावी त्याबरोबरच पक्षांतरगत राजकारण टाळण्यासाठी मराठा नेत्यांना डावलून इंदिरा यांनी अंतुले यांना मुख्यमंत्री पदावर बसवले(1980).गुन्हेगारी क्षेत्रात रान मोकळे सोडलेले पवार बरे होते असं राहून राहून वाटत ,कारण अंतुले यांनी राणाबरोबरच "माळ"रान सुद्धा मोकळे सोडले (मुंबई चा समुद्र )खूप साऱ्या टोळ्या आणि गुंड याच काळात गुन्हेगारी विश्वात पदार्पण करू लागल्या त्यामध्ये बहुतांश जण मुसलमान होते (करीम लाला ,हाजी मस्तान ,वरदराजन )ह्या टोळ्या त्याच काळात मोकाट सुटल्या अनियंत्रित पणे आपले सर्व काळे धंदे राजरोसपणे चालायचे.अंतुलेंनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही "ज्याची समुद्रावर पकड त्याची मुंबईवर पकड "अश्या चर्चा त्याकाळी होत होत्या आणि घडलं ही तसंच ,समुद्रमार्गे तस्करी होऊ लागली त्यामध्ये अमली पदार्थ ,अवैध्य दारू आणि हत्यार सुद्धा मुंबईतुन बिनधास्त पणे पाठवू जाऊ लागले आणि येऊही लागले ,त्यामध्ये मध्य पर्वेतून आणि दक्षिण आशिया तुन येणारा हवाल्याचा पैसा सुद्धा येत असे.(8)
जोलीओ रिबेरो आणि yc पवार हे दोन अधिकारी फक्त याला अपवाद होते ,मुंबई मधील गुन्हेगारी संपवायची असेल तर गुन्हेगार आणि त्यांची दहशत संपवावी लागेल ,आक्रमक आणि निडर स्वभावाचे yc पवार कामाला लागले आणि गुन्हेगारांच्या याद्या बनवायला सुरुवात झाली कार्यवाही सुद्धा चालू झाली ,मुंबईच्या किंबहुना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांनी गोळी ला उत्तर गोळीच ,या नीतीचा अवलंब केला असेल ,पवारांनी थेट वरदराजन मुदलियार यालाच संपवायचं ठरवलं ,पुढे तो मुंबई सोडून चेन्नई ला गेला. पण पवार आज सुद्धा खंत व्यक्त करतात की काही अधिकारी आणि पोलीस हे नेते आणि क्रिमिनलस यांच्या दावणीला बांधलेले आहेत.पुढे काँग्रेस च्या काही स्थानिक आणि चेन्नई मधील खासदार आणि आमदारांनी अंतुले आणि इंदिरा यांच्याकडे मागणी केली की yc pawar आणि rebero यांना हटवा किंवा ते पदासाठी योग्य नाहीत आणि झालंही तसंच दोघांना सुद्धा मुंबई तुन बाहेर जावं लागलं.(9)आपल्याच निर्णय आणि धोरणाच्या बळी इंदिरा गांधी ठरल्या अंतुलेंच्या मागे सिमेंट वाटप आणि त्यातील भ्रस्टाचार प्रकरण भोवले व त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं.आता जे मुंबई पुढे अनुभवनार आहे तिचे मूळ आणि शेंडे हे फक्त दिल्ली पर्यंतच नाही तर थेट दुबई ,बँकॉक ,लाहोर ,कराची ,वॉशिंग्टन,newyork पर्यंत जातात,कारण हवाला ,तस्करी ,हत्या ,चोऱ्या ,टोळीयुद्ध या प्रकारची गुन्हेगारी अवगत असलेली मुंबई लवकरच जागतिक दहशदवादाचा क्रूर चेहरा अनुभवनार होती,आणि हे सर्व घडणार होत ते आपल्या राजकीय उदासीनतेमुळे आणि लोकांच्या दुर्लक्ष करण्यात "पुरुषार्थ"समजनाऱ्या वृत्ती तुन ,आता त्यात काही पुढारी आणि अधिकारी बांडगुळ सक्रिय सहभागी होते तो वेगळा विषय आहे ते कसे होते आता हे वेगळं सांगायची गरज नाही.(10)
दोन मराठी नेते आता मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटला वर "खेळ"करणार होते त्या दोघांचेही ध्येयधोरणे ,उद्दिष्टे,आणि काम करण्याची पद्धत वेगळी होती.एक आक्रमक तर दुसरा चिकाटीबाज,एका नेत्याने खूप लवकरच आपली पकड राज्यच्या आणि देशाच्या राजकारणात घट्ट केली होती. साम ,दाम ,दंड ,भेद वापरून का होईना पण "पवार" हे नाव देशातील प्रमुख नेत्यांच्या यादीत येऊन पडले होते.
गरिबी हटाओ ते शहाबानो प्रकरण जर आपण नीट आणि उकल करून बघितलं तर आपल्या धान्यात येईल की काँग्रेस आता आपल्या हक्काचा आणि हमी देणारा मतदार तयार करू पाहत होते. आणि पवारांनी सुद्धा तोच मार्ग निवडला "धर्मनिरपेक्षतेचा"आणि राज्यात पकड मजबूत राहण्यासाठी त्यांनी शेती ,सहकार,क्षिशण हे मार्ग सुद्धा निवडले पुढे ते त्यांच्या फायद्याचे ठरले.पण पवार आजही पूर्ण होऊन सुद्धा अपूर्ण आहेत कारण प्रत्येक वेळेस जेव्हा त्यांचं नाव पंतप्रधान पदासाठी आलं तेव्हा मात्र पवार "एका अस्सल मराठी माणसासारखे"फक्त गृह-हीत धरल्या गेले.(11)उजव्या संघटना 1970 च्या नंतर जेव्हा सक्रिय व्हायला सुरु झाल्या,तेव्हाच त्याचा बंदोबस्त करण्यासाठी "धर्मनिरपेक्ष"हा शब्द भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत घालण्यात आला,आणि अल्पसंख्यांक आणि गरिबांचे कल्याण हे विषय भारतीय राजकारणात चर्चिल्या जाऊ लागले.उजव्यांचं ठीक आहे पण डावे कसे शांत आणि निष्प्रभ करायचे?हा प्रश्न काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांना पडला असावा ,आणि याच प्रश्नाचे उत्तर आहे आपल्या खेळाच्या पटलावरचा दुसरा नेता ,ते म्हणजे बाळ ठाकरे (बाळासाहेब ठाकरे)
काँग्रेस ने सहज केलेला प्रयोग यशस्वी होत होता,आणीबाणी च्या दरम्यान झालेल्या इंदिरा आणी ठाकरे भेटीत कदाचित ही गोष्ट पक्की झाली असेल की "बाळ ठाकरे "तुम्ही राज्यातले डावे सांभाळा मी उजवे (इतर विरोधक)सांभाळते ,कारण आणीबाणी ला पाठिंबा बाळासाहेब का देतील?
कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या उघड उघड असताना सरकार काहीच का दखल घेत नाही किंबहुना योग्य तो तपास का करत नाही?1993 च्या आधी फक्त मराठी माणूस याच विषयावर आपला राजकीय गाडा हाकणारे बाळासाहेब ,जेव्हा मराठी गिरणी कामगार उध्वस्त होत होता आणी कामगार चळवळ लुप्त होत होती तेव्हा सुद्धा बाळासाहेब गप्प का बर बसले असतील?आपल्या विशेष शैलीत त्यांनी का उत्तर दिल नसेल?अशी बरीच प्रश्न आहेत जे आजही अनुतर्रीत आहेत.(12)1966 साली स्थापण झालेला पक्ष जेव्हा 15 वर्षे फक्त संघटना म्हणूनच जर काम करत असेल तर नक्कीच त्या पक्षाचा राजकीय मार्ग बिकट आहे असं वाटायला लागत,मराठी माणूस या मुद्द्यावर शिवसेनेचे काही प्रतिनिधी निवडून सुद्धा येऊ लागले आणी एक स्थानिक पक्ष म्हणून शिवसेना चांगलाच जम बसवू लागली आणी लोक सुद्धा स्वीकारू लागले,पण पाहिजे असे यश आणी प्रसिद्धी आजही शिवसेना मिळवू शकत नव्हती ,(13)पण डिसेंबर 1992 मध्ये जे झालं त्याने बऱ्याच जणांचं राजकीय नामकरण आणी पुनर्वसन केलं त्यामध्ये ,मराठी माणसाचा पाठीराखा ते हिंदू हृदय सम्राट हा प्रवास बाळासाहेब यांनी फक्त दोन वर्षात केला (1992-1993)बाबरी मस्जिद प्रकरण आणी त्यानंतर उसळलेल्या दंगली बाळासाहेब यांना राष्ट्रीय ओळख देऊन गेल्या ,कुठे एक स्थानिक पक्ष जो मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो किंवा लढला तो आता हिंदूंसाठी लढणार होता.त्यातली प्रामाणिकता आपण नंतर तपासून पाहू कारण सध्या तो आपला विषय नाहीये पण एक गोष्ट नक्की की ,मराठी माणूस आणी महाराष्ट्र आजही दुय्यम वागणूक पचवत असतो कारण ती सवय त्याला लावली गेलीये.1995 च्या निवडणुकीत शिवसेनेला त्याचा (1993 मुंबई दंगे )फायदा जरी झाला असला तरी तो क्षणिक होता
कारण आजपर्यंत शिवसेना एकदाही एकहाती सत्ता
आणू शकलेली नाहीये ,वय चोपन्न आणी जागा छप्पन"असं मानलं तरी चालेल.
पण एक बिनधास्त आणी धाडसी हिंदू नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख पूर्ण देशात झाली.
बाळासाहेब यांच्या बरोबरच अजून एका माणसाचे नामकरण 1993 मध्ये झाले होते,ते नाव म्हणजे दाऊद इब्राहिम कासकर तेच नाव बदलून terrorist and most wanted दाऊद इब्राहिम कासकर असे झाले होते.
Dayanesh more
9623480172.
नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे, सर्वप्रथम तुम्ही माझ मत जाणून घेण्यासाठी इथपर्यन्त आलात त्याबद्दल तुमचे आभार! या ब्लॉगस्पॉटमार्फत मी देशातील राजकीय गोष्टीवरील माझे निरीक्षण आणि त्याच झालेलं माझं आकलन मी याठिकाणी लिहीत असतो. "व्यक्ति तितक्या प्रवृत्ती" या गुणधर्मानुसार, इथे लिहिलेली मते ही सर्वस्वी माझी मते असल्याने ती सर्वाना पटतील असं नाही. पण याठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की येथील मते ही निपक्षपाती आणि सर्वसामान्य लोकांना आकलनात येतील अशी असतील.
Sunday, July 19, 2020
मुंबई आणि महाराष्ट्रातील अधोविश्व -संघटित गुन्हेगारी (पूर्वार्ध -1993 मुंबई साखळी स्फ़ोट आणि बदललेल राजकारण)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)
Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...
-
देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्...
-
विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो,...
-
2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्या होत्या. निवडणुकीपूर...
काही मुद्दे किंवा घटना यांवर आपलं काही वेगळं मत असेल तर तेही मांडू शकता l.
ReplyDeleteलय भारी मोरे साहेब
ReplyDelete