Tuesday, April 5, 2022

शिवसेनेच्या बदलत्या भूमिका-2

महाराष्ट्रात आणि देशात उजव्या संघटना  1970 च्या नंतर सक्रिय व्हायला सुरु झाल्या,तेव्हाच शिवसेनेमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. काँग्रेस साठी हे डोईजड ठरणार होते, दक्षिणेत आणि उत्तरेत लोकांच्या जातीय, धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोर धरत होत्या. महाराष्ट्रातील आणि देशातील अस्थिरतेचा बंदोबस्त करण्यासाठी "धर्मनिरपेक्ष"हा शब्द भारतीय संविधानाच्या


प्रस्तावनेत घालण्यात आला, या निर्णयाचे अजूनही कोणतेच ठोस कारण इतिहासात सापडत नाही, मग नंतर अल्पसंख्यांक आणि गरिबांचे कल्याण हे विषय भारतीय राजकारणात चर्चिल्या जाऊ लागले..त्यामुळे काही दिवस शिवसेना काँग्रेस च्या छत्रछायेखाली राहिली, दोन विधानपरिषदेच्या, जागा, नगरसेवक आणि बऱ्याच गोष्टी शिवसेनेला वसंतराव नाईकांच्या कृपेने मिळाल्या.  उजव्यांचं ठीक आहे पण डावे कसे शांत आणि निष्प्रभ करायचे?हा प्रश्न काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांना पडला असावा ,आणि याच प्रश्नाचे उत्तर होते ,दस्तुरखुद्द, बाळ ठाकरे म्हणजेच (बाळासाहेब ठाकरे)
काँग्रेस ने सहज केलेला प्रयोग यशस्वी होत होता,आणीबाणी च्या दरम्यान झालेल्या इंदिरा आणी ठाकरे भेटीत कदाचित ही गोष्ट पक्की झाली असेल की "बाळ ठाकरे "तुम्ही राज्यातले डावे सांभाळा मी उजवे (इतर विरोधक)सांभाळते ,कारण आणीबाणी ला पाठिंबा बाळासाहेब का देतील? आणीबाणीला दिलेल्या पाठिंब्याचा त्यांना पुढे फायदा झालेला आहे.

1970 कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येचे आरोप बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लागले होते, हत्या उघड उघड असताना सरकार काहीच का दखल घेत नाही किंबहुना योग्य तो तपास का करत नाही? असा प्रश्न तेव्हाच्या नेत्यांना पडला होता, ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय हत्या होती, डांगे यांच्या मृत्यूनंतर अनेक तरुण शिवसेनेकडे वळले, अनेक कामगार विशेष करून गिरणी कामगार(तरुण मुले)पर्याय नसल्यामुळे शिवसेनेकडे जात होते. शिवसेनेत अनेक कामगार सेना स्थापन होत होत्या,पण पुढे गिरणी कामगारांच्या संपात शिवसेनेची भूमिका सावत्रपणाची होती, तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी संबंध जपणे ही शिवसेनेची प्राथमिकता तेव्हा होती.(ar antule)   1980च्या आधी फक्त मराठी माणूस याच विषयावर आपला राजकीय गाडा हाकणारे बाळासाहेब(शिवसेना) ,जेव्हा मराठी गिरणी कामगार उध्वस्त होत होता आणी कामगार चळवळ लुप्त होत होती तेव्हा सुद्धा बाळासाहेब(शिवसेना) गप्प का बर बसले असतील?आपल्या विशेष शैलीत त्यांनी का उत्तर दिल नसेल?अशी बरीच प्रश्न आहेत जे आजही अनुतर्रीत आहेत. 1966 साली स्थापण झालेला पक्ष जेव्हा 15 वर्षे फक्त संघटना म्हणूनच जर काम करत असेल तर नक्कीच त्या पक्षाचा राजकीय मार्ग बिकट आहे असं वाटायला लागत,मराठी माणूस या मुद्द्यावर शिवसेनेचे काही प्रतिनिधी निवडून सुद्धा येऊ लागले आणी एक स्थानिक पक्ष म्हणून शिवसेना चांगलाच जम बसवू लागली आणी लोक सुद्धा स्वीकारू लागले,पण पाहिजे असे यश आणी प्रसिद्धी आजही शिवसेना मिळवू शकत नव्हती .पण डिसेंबर 1992 मध्ये जे झालं त्याने बऱ्याच जणांचं राजकीय नामकरण आणी पुनर्वसन केलं त्यामध्ये ,मराठी माणसाचा पाठीराखा ते हिंदू हृदय सम्राट हा प्रवास बाळासाहेब यांनी फक्त दोन वर्षात केला (1992-1993)बाबरी मस्जिद प्रकरण आणी

 त्यानंतर उसळलेल्या दंगली बाळासाहेब यांना राष्ट्रीय ओळख देऊन गेल्या ,कुठे एक स्थानिक पक्ष जो मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो किंवा लढला तो आता हिंदूंसाठी लढणार होता.त्यातली प्रामाणिकता आपण नंतर तपासून पाहू कारण सध्या तो आपला विषय नाहीये पण एक गोष्ट नक्की की ,मराठी माणूस आणी महाराष्ट्र आजही दुय्यम वागणूक पचवत असतो कारण ती सवय त्याला लावली गेलीये.1995 च्या निवडणुकीत शिवसेनेला त्याचा (1993 मुंबई दंगे )फायदा जरी झाला असला तरी तो क्षणिक होता
कारण आजपर्यंत शिवसेना एकदाही एकहाती सत्ता
आणू शकलेली नाहीये ,वय चोपन्न आणी जागा छप्पन"असं मानलं तरी चालेल.
पण एक बिनधास्त आणी धाडसी हिंदू नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख पूर्ण देशात झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...