Wednesday, April 6, 2022

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ला हलक्यात का घेण्यात येतंय?


(Blog ला follow करा)
सध्या महाराष्ट्राचं राजकारण एका अभूतपूर्व टप्प्यातून जात आहे ,जिथं स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्याचे कपडे काढल्या जात आहेत. पूर्वी जर एखाद्या नेत्यावर आरोप लागले तर तो नैतिकता पाळून बाजूला होत असे,आता त्यांचं काही काढता येईल का ,अस विचारल्या जात. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस चे स्थान लहान भावासारखे आहे, बघून दुर्लक्ष करणे, याची जाण महाराष्ट्र काँग्रेस ला पण आहे.(महाराष्ट्र काँग्रेसचा नेमका कोण आहे)एक तात्पुरती गरज म्हणून काँग्रेस कडे सध्या पाहिलं जातं आहे, पण या काँग्रेस च

 महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे. विचार करा जर काँग्रेस किंवा काँग्रेस मधील नाराज आमदारांचा गट जर बाहेर पडला तर? उरलेल्या दोन्ही पक्षाची काय स्थिती होईल?काँग्रेस या पक्षात सध्या अनेक गट आपल्याला दिसून येतात, पण अजूनही पक्षशिस्त आणि दिल्लीचे फर्मान काँग्रेस मध्ये पाळल्या जाते, एक तर काँग्रेस चा नेता पक्षच सोडतो नाहीतर दिल्लीच ऐकतो तरी. हा त्या पक्षाचा इतिहास आहे, विलासराव देशमुख असो की अशोकराव चव्हाण यांच्यावर आरोप लागल्याच्या नंतर त्यांनी लगेच राजीनामा दिला होता.. या विद्यमान आघाडीमध्ये मुळात काँग्रेस कडे आदराने आणि आपुलकीने बघितल्याच गेलं नाही, एक गरज आणि तडजोड हे दोनच शब्द या नात्याचे भांडवल आहेत त्यापलीकडे काहीच नाही. काँग्रेस मधील अनेक आमदारांना आज आवाजच उरलेला नाही, मग सत्तेत असून आणि नसून फायदा काय आहे, असा विचार आज काँग्रेस चे आमदार करत आहेत, त्यापुढे जाऊन आपला हक्काचा आणि मूळचा मतदार काही प्रमाणात का होईना काँग्रेस वर नाराजच असेल, कारण आजही वैचारिक दृष्ट्या प्रामाणिक मतदार दिसून येतात मग ते काँग्रेस चे असो की भाजप चे. महाविकास आघाडी स्थापन होतानाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हे नको होतं, पण पक्षफुटीच्या भीतीने , आणि शरद पवारांच्या धास्तीने काँग्रेस ने या आघाडीत सहभाग घेतलेला.
पण आता ते योग्य वेळेची वाट पाहत असावेत. या आघाडीचा थोडा फायदाही कदाचित काँग्रेस ला झाला असावा पण म्हणावी तशी

 संघटना त्यांना वाढवता आलेली नाहीये, आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी मात्र स्वबळाचा नारा देत आहेत, शरद पवारांचे मोदींना आणि अमित शहा यांना भेटी देणं चालूच आहेत, याच शरद पवारांच्या अस्थिर आणि धूर्त स्वभावामुळे त्यांनी कधीच त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही.. आणि पवार हे जाणतात की काँग्रेस 100% विश्वास माझ्यावर कधीच ठेवणार नाही, म्हणून ते कधी मोदी यांच्याकडे तर कधी ठाकरे यांच्याकडे जात असतात.. तिसऱ्या आघाडीचा पर्याय, काँग्रेसला खुले आव्हान हे इतर पक्ष देत आहेत, त्यामध्ये पवार आणि ममता पुढे आहेत, हा तर थेट काँग्रेसच्या अस्तित्वावर घाला आहे, आणि ते काँग्रेस सारख्या पक्षाला परवडणारे नाही.. त्यामुळे या ताणलेल्या आणि अनैतिक नात्याचा शेवट काँग्रेस कधीही करू शकते.. 

No comments:

Post a Comment

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...