Thursday, April 21, 2022

प्रशांत किशोर काँग्रेसला जीवदान देऊ शकतात का? prashant kishor can save congress?

अचूक भविष्यकथन मुरलेला जोतिषी सुद्धा करू शकत नाही, राजकारणाचं सुद्धा तसंच असत, काही घडामोडी आणि नेत्यांचं वलय या दोन गोष्टीवर अंदाज लावल्या जाऊ शकतात.. आपण या लेखात फक्त आढावा घेऊ की काँग्रेस या पक्षाला पुन्हा जिवंत होण्याला वाव का आहे ते? संघटनाच्या नावाखाली आज काँग्रेस खूप बदनाम होत आहे, पण उद्या सत्ता आली तर नाव ठेवणारे लोकच म्हणतील की काँग्रेसने मेहनत करून निवडणूक जिंकली ते. सत्तेत असल्यावर पक्ष वाढतो अस म्हणतात ते अगदी योग्य आहे, आणि नेमकं तेच काँग्रेस सोबत होतंय.. सत्ता नसल्यामुळे कार्यकर्ते थांबत नाहीयेत, जे लोक आहेत त्यांना हुरूप देण्याचं काम आधी काँग्रेसने हाती घेणे गरजेचे आहे.. मग ते कोणत्याही पद्धतीने असो, pk यांच्या मदतीने किंवा इतर कार्यक्रम राबवून. Pk यांना सक्रिय राजकारणात येण्याची ईच्छा गेल्या अनेक दिवसांपासून होती,

 बहुतेक काँग्रेस ती आता पूर्ण करणार आहे..पण प्रशांत किशोर हे जितके सल्लागार म्हणून पक्ष वाढवू शकतात ते तितके पक्षात सक्रिय होऊन पक्ष वाढवू शकत नाहीत.. काँग्रेस या पक्षाचे दरबारी राजकारण सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे प्रश्नात किशोर हे काँग्रेससाठी कोणत्याप्रकारे काम करतात हे महत्त्वाचं आहे.
2024 च्या साठी प्रशांत किशोर तयारी करत नसावेत, त्यांचा बहुदा हा प्रयत्न असावा की काँग्रेस च्या मताचा टक्का वाढला पाहिजे जेणेकरून 29 च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होऊ शकतो आणि तिसऱ्या आघाडीच्या चर्चा बंद होऊ शकतात.. त्यांचा पहिला प्रयत्न हा असेल की पक्षाला एखादा कार्यक्रम आणि जिवंतपणा देने.. ठोस विरोधी पक्ष आणि देशातील सर्वात जुना व मोठा पक्ष अशी ओळख pk पक्षाला देण्याचा प्रयत्न करतील.
त्याबरोबरच जुने खोड बाजूला सारून नवीन कार्यकर्ते आणि नवीन संकल्पना घेऊन लढण्याचा प्रश्नात किशोर आणि राहुल गांधी यांचा प्रयत्न असेल, कारण राहुल गांधी यांनीच pk यांना पक्षात येण्याची विनंती केली आहे.. pk जर पक्षात आले तरी ते राहुल गांधी यांच्यासाठी चांगले आहे कारण त्यामुळे त्यांचा गट आणि बाजू

 मजबूत होईल, कारण राहुल यांना पक्ष बहुतेक धुवून काढायचा आहे. सामाजिक आणि राजकीय अभ्यास व वेगवेगळ्या आयडिया देने ही प्रशांत किशोर यांची जमेची बाजू आहे, तसेच त्यांचे इतर राज्यात नेटवर्क आणि ओळखी चांगल्या आहेत, काँग्रेस बऱ्यापैकी ते आपल्या पदरात पाडू शकते.. तरीसुद्धा किशोर आले आणि पक्ष जिंकला असं मुळीच होत नसत, पक्षाला आपली बाजू ठोस मांडावी लागत असते, मुद्दे शोधावे लागत असतात 2014 च्या निवडणुकीचे उदाहरण घ्या.. मुद्दा आणि फक्त चेहरा या दोन गोष्टीवर मोदी जिंकले.. तसंच काहीसं काँग्रेसच्या बाबतीत आहे जर मुद्दा आणि प्रभावी प्रचारयंत्रणा असेल तर मग संघटना आणि इतर गोष्टी दुय्यम ठरतात..

No comments:

Post a Comment

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...