आपल्या धारनेच्या आधारावर आणि लादल्या गेलेल्या विचारावर आपण राजकारणाकडे बघत असतो.. आक्रमक किंवा अनावश्यक बोलणाऱ्या नेत्यांना आणि पक्षांना आपल्या राज्याने नेहमीचं खांद्यावर ठेवले आहे, डोक्यावर कधीच घेतले नाही, उदाहरण म्हणून महाराष्ट्रात अशोक चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतात पण नाना पाटोले यांची हमी कोणी घेईल का? अजित दादांच कॅडर एवढं मजबूत असूनसुद्धा एकदाही मुख्यमंत्री नाही? असं का? दुसऱ्या देवेंद्र हे परिचित नसताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होतात, आणि निवडणूका सुद्धा जिंकतात.. त्याच गणित स्पष्ट आहे, तुमच्याकडे मुद्दा आणि कर्तृत्व या दोन गोष्टी लागतात..2014 च्या नंतर
भारताच्या राजकारणात खूप बदल झाले आहेत, प्रचारात सुद्धा बदल झाले आहेत, आता भोंग्याने किंवा जागोजागी जाऊन प्रचार होत नाही, प्रत्येक पक्ष आज सोशल मीडियावर हजारो कोटी रुपये खर्च करतो, माहिती विभाग हा एक सरकारी विभाग आहे ज्याद्वारे सरकार आपला प्रचार करत असते.. मोठ्या स्थरावर घेऊ भारतात 80 कोटी लोक फोन वापरतात, नेट सुद्धा वापरतात आज ते सगळे लोक कधीही आणि केव्हाही पक्षासोबत जोडू शकतात, किंवा संदेश पाठवून कॉल करून नागरिकांना आज राजकीय पक्ष संदेश देत आहेत.. भाजपकडे आज जवळपास 60 हजाराच्यावर ट्विटर खाते आहेत, मोठी it सेल आहे, देशात कधी कोणताही ट्रेंड ते चालवू शकतात, आणि राजकीय वार बदलू शकतात.. म्हणजे जो जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्याच काम खूप सीमित झालं आहे, त्याला जेव्हा गरज आहे, तेव्हाच बोलावलंय जाईल.. पण
प्रचारासाठी आणि आपला संदेश पोहचवणेयासाठी कोणताच पक्ष आज कार्यकर्त्यांवर अवलंबून नाहीये.. राज ठाकरे हे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांच्याकडे कोणता कॅडर होता? तरीही त्यांनी 2009 साली 17 आमदार निवडून आणले, ते मुद्द्यांच्या आणि गुडद्यांच्या जोरावर नाकी तुमच्या कॅडरवर.. मतदार आणि कार्यकर्त्यांना आज ऑनलाइन सिस्टिम द्वारे सर्व पक्ष जोडू पाहत आहेत, अनेक सदस्यनोंदनी मोहीमा चालवत आहेत, जे की पक्षाचं online कॅडर आहे, उद्या तेच लोक पक्षाचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवतील.. एवढंच नाही तर प्रत्येक नेत्यांचे आणि पक्षांचे हल्ली काही समाज माध्यम आणि youtube वर प्रचारक असतात, त्यामुळे आता tv वर अवलंबून राहण्याची गरज सुद्धा त्यांना नाहीये.. काँग्रेसला नवजीवन देण्यासाठी अश्याच प्रकारचे काही सल्ले प्रशांत किशोर यांनी गांधींना दिले आहेत, आणि प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये नवचैत्यन टाकतील अशी आशा धरायला काही हरकत नाही.
No comments:
Post a Comment