Tuesday, May 3, 2022

फक्त 'राज'कारण..

एखाद्या भुकेजलेल्या व्यक्तीला जर अन्न दिले तर तो मांसाहार आहे की शाकाहार हा विचार करत नाही. अगदी राज यांच तसंच झालेलं आहे, मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्व धरल्यानंतर राज यांच्यात अनेक बदल झाले आहेत.पण जर तुम्ही राज ठाकरे यांना गेल्याकाही वर्षांपासून जर फोल्लो करत असाल तर ते बदल तुमच्या लक्षात येतील.. पक्ष जिवंत ठेवणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या अध्यायाल राज सुरू करू पाहत आहेत.. उदार आणि स्पष्ट भूमीकेसाठी ओळखले जाणारे राज, आपल्या पक्षाच्या झेंड्यात
 निळा आणि हिरवा रंग घालणारे राज आज कट्टर हिंदुत्त्ववादी का झाले? राज ठाकरे यांनी हा भोंग्याचा मुद्दा आणि एकंदरीतच आक्रमक हिंदुत्व हा मुद्दा स्वइच्छेने घेतला का? तर याच उत्तर मला नाही, असं वाटत आहे.. राज गेल्या दोन वर्षांपासून राज्यात आपली जागा तयार करू पाहत आहेत, गेल्या महिन्यात त्यांना सूर सापडला आणि औरंगाबादच्या सभेत त्यांनी राग छेडला.. पण एक गरज म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली असं वारंवार जाणवतं, कारण मराठी बाणा आणि कमीत कमी इस्लाम द्वेष करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताना दिसून येतात.. किंवा मुसलमान विरोध करताना ते थोडे अस्वस्थ वाटतात.. संभाजीनगरची सभा एकदा पुन्हा बघा मग तुम्हाला ते कळेल.. बाळासाहेबांचं राजकारण हिंदुनिष्ठ होतंच, पण ते कुठेतरी मुसलमान शत्रूकेंद्री होत.. आणि राज यांना सुद्धा ते
 आता करावंच लागेल.. राज यांनी ही नवी भूमिका तात्पुरती घेतल्यासारखी वाटत नाही.. कारण राज्यात सध्या आक्रमक हिंदुत्त्वाच्या मोठा स्पेस खाली आहे आणि राज ठाकरे तो घेऊ पाहत आहेत.. भाजपच्या मदतीने कदाचित ते घेतीलही.. पण भाजप राज यांना सामावून घेईल का? हा महत्वाचा प्रश आहे. पण सध्याचा विचार केला तर नक्कीच भाजप आणि मनसे यांच्या युतीला चांगलाच स्कोप आहे. या दोन वर्षाच्या कार्यकाळात जर मनसेने फक्त स्वतःला शिवसेनेचा पर्यायी पक्ष म्हणून सिद्ध करण्यात घालवली तर नक्कीच राज्यात त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण होईल, पण जर विषय घेऊन धरसोड आणि भाजप सोबत जर युती झाली आणि मिळालेला वाटा घेऊन मनसे शांत राहिली तर त्यांची अवस्था सुद्धा मनसे सारखीच होईल.. आणि भाजपचा पुरेपूर प्रयत्न असेल की मनसे नावाचे नवहिन्दू फक्त महानगरपालिका पुरतेच मर्यादित राहावे जेणेकरून त्यांच्यावर चुकीचा प्रभाव पडायला नको.. पवार यांच्यावर टीका करून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे
 राज्याच्या राजकारणात मुळापासून बदल करू इच्छित आहेत.. अगदी "आधार"वडाचेचं मूळ तासण्याचा विचार ही नवीन जोडी करत आहे.. त्यांची युती होण्यावर पुढील गणित अवलंबून आहेत..
पुढच्या भागात आपण नक्कीच बघू की महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय बदल झाले आहेत..आणि काय बदल होतील..

No comments:

Post a Comment

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...