निळा आणि हिरवा रंग घालणारे राज आज कट्टर हिंदुत्त्ववादी का झाले? राज ठाकरे यांनी हा भोंग्याचा मुद्दा आणि एकंदरीतच आक्रमक हिंदुत्व हा मुद्दा स्वइच्छेने घेतला का? तर याच उत्तर मला नाही, असं वाटत आहे.. राज गेल्या दोन वर्षांपासून राज्यात आपली जागा तयार करू पाहत आहेत, गेल्या महिन्यात त्यांना सूर सापडला आणि औरंगाबादच्या सभेत त्यांनी राग छेडला.. पण एक गरज म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली असं वारंवार जाणवतं, कारण मराठी बाणा आणि कमीत कमी इस्लाम द्वेष करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताना दिसून येतात.. किंवा मुसलमान विरोध करताना ते थोडे अस्वस्थ वाटतात.. संभाजीनगरची सभा एकदा पुन्हा बघा मग तुम्हाला ते कळेल.. बाळासाहेबांचं राजकारण हिंदुनिष्ठ होतंच, पण ते कुठेतरी मुसलमान शत्रूकेंद्री होत.. आणि राज यांना सुद्धा ते
आता करावंच लागेल.. राज यांनी ही नवी भूमिका तात्पुरती घेतल्यासारखी वाटत नाही.. कारण राज्यात सध्या आक्रमक हिंदुत्त्वाच्या मोठा स्पेस खाली आहे आणि राज ठाकरे तो घेऊ पाहत आहेत.. भाजपच्या मदतीने कदाचित ते घेतीलही.. पण भाजप राज यांना सामावून घेईल का? हा महत्वाचा प्रश आहे. पण सध्याचा विचार केला तर नक्कीच भाजप आणि मनसे यांच्या युतीला चांगलाच स्कोप आहे. या दोन वर्षाच्या कार्यकाळात जर मनसेने फक्त स्वतःला शिवसेनेचा पर्यायी पक्ष म्हणून सिद्ध करण्यात घालवली तर नक्कीच राज्यात त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण होईल, पण जर विषय घेऊन धरसोड आणि भाजप सोबत जर युती झाली आणि मिळालेला वाटा घेऊन मनसे शांत राहिली तर त्यांची अवस्था सुद्धा मनसे सारखीच होईल.. आणि भाजपचा पुरेपूर प्रयत्न असेल की मनसे नावाचे नवहिन्दू फक्त महानगरपालिका पुरतेच मर्यादित राहावे जेणेकरून त्यांच्यावर चुकीचा प्रभाव पडायला नको.. पवार यांच्यावर टीका करून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे
No comments:
Post a Comment