(पूर्वार्ध)..part1 (video-शिवाजी महाराज आणि जातीचे राजकारण https://youtu.be/HffNjJQ3wys)
बदललेल्या प्रवाहाला शिवसेनेने सुद्धा स्वीकारले होते, नारायण राणे यांना एक मराठा मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना पदावर बसवाव लागलं.. नकळत पणे महाराष्ट्रात मराठा, ब्राम्हण, आणि इतर असा राजकीय गट पडला होता, अनेक संघटना त्याकाळी टोकाचा प्रचार किंवा त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर खरा इतिहास समोर आणून ब्राम्हण कसे चुकीचे होते हे अत्यंत आक्रमक कधी कधी तर अभद्र भाषेत सांगू लागले, यातून बऱ्याच तरुणांच्या मनात कायमचा जातिद्वेष पेरल्या गेल्या पर्यायाने व्यक्तीचा द्वेष पण लोक करू लागले किंबहुना आजही करतात.. त्यातून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मराठा मतदार राज्यात गोळा झाला, तसच इतिहासात आणि वर्तमानात मुसलमानांना जवळ करून ती बाजू सुद्धा पक्षाने घट्ट केली.. दुर्दव्याने एवढ्या टोकाचा जातीवाद महाराष्ट्राने कधीच पाहिला नसेल तेवढा जातीवाद 2000-2010 यावर्षात बघितला, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ब्राम्हण विरुद्ध मराठा असा संघर्ष होताच, पण त्याला द्वेषाची कगार नव्हती, जी हल्लीच्या राजकारणात आहे.. यातून फक्त समाजाचे नुकसान झाले असे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना आणि विभागणी होऊन बसली, ज्या शाहू, फुले, आंबेडकर या सर्वांनी ज्यांची प्रेरणा घेतली त्यांची वाटणी एक जातीपूर्ती झाली होती तसेच महाराजांना वैचारिक मंचावरून पण बाजूला करण्यात आले होते.. कधी तुम्हाला एखाद्या कॉलेज किंवा खाजगी कार्यक्रमात महाराज दिसतात का? बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन या प्रकरणामुळे तर सर्वच राजकीय पक्षांना मोठी संधी चालून आली होती, या घटनेतून ब्राम्हण विरुद्ध मराठा हे वितुष्ट किंवा विरोध अधिकच वाढत गेला, काही संघटना या आगीत
सारख्या तेल टाकत होत्या आणि डोकी भडकवात होत्या.. आणि राजकारणी डाव साधत होते.. पुढे ब्राम्हण मतदार भाजपकडे वळला विखुरलेल्या obc समाजाला भाजपने एक करण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी त्यात ते यशस्वी झाले, शिवसेना आणि भाजपने
Chan Dnyaneshwar dada waiting for part 2
ReplyDelete