Monday, April 11, 2022

भाजप पक्ष नेमक्या निवडणुका जिंकतो कशा?


पूर्वार्ध-भाग 1


How bjp won election

निवडणुका जिंकणे हा एखाद्या राजकीय पक्षाचा मुख्य अजेंडा असतो.. वैचारिक अजेंडा असण्याचा काळ भारतातून संपला आहे, त्यामुळे ती गोष्ट आपण मान्य केली पाहिजे.. जिथे चळवळी संपतात तेथे शुद्ध वैचारिक राजकारण संपलेलं असतं अस मला वाटत.. त्यामुळे नेमकं आणि मुद्द्याचे आपण या लेखात बोलू किंवा चर्चा करू..1984 पासूनच या दोन्हीही पक्षांची स्पर्धा सुरू झाली, काँग्रेस आणि भाजप सुद्धा आणि काही इतर राजकीय पक्ष जे हळूहळू जन्म घेत होते, उदयाला येत होते त्यांचा जन्म सुद्धा याच काळात झाला.. म्हणजे आपण काँग्रेस आणि भाजप ची स्पर्धा1984 पासूनच करायला पाहिजे नाकी 1947 पासून किंवा

 त्याआधीपासून.. काँग्रेस 80 च्या दरम्यान फुटून पुन्हा नव्याने आपला जम बसवत होती.. चांगली think tank हा भाजपचा नेहमीच जमेचा मुद्दा राहिलेला आहे, म्हणजे जेथे तुम्हाला प्रशांत किशोर यांना करोडो रुपये देऊन जण यात्रा किंवा रथ यात्रा काढण्याचे सल्ले मिळतात, ते भाजप मध्ये त्यांचेच नेते देतात आणि ते सफल सुद्धा करून दाखवतात..1989 प्रमोद महाजन यांच्या सांगण्यावरून भाजपने रथ यात्रा काढली आणि पूर्ण भारतामध्ये आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला..1989 मध्ये त्या यात्रेच तगड नियोजन, पैसा, प्रचार आणि श्रम या एवढ्या गोष्टी भाजपने त्या रथयात्रेत टाकल्या आणि आपला पाया मजबूत करून घेतला आजही पक्षाची वैचारिक बैठक रथयात्रा या मुद्द्याशिवाय पूर्ण होत नाही. तात्पर्य हेच की तुम्हाला पक्षवढीसाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, पूर्णतः भाडोत्री कार्यकर्त्यांवर अवलंबून राहता येणार नाही.. जर मोठ्यमोठ्या नेत्याकडूनच कार्यकर्त्याला प्रेरणा मिळत नसेल तर तो पक्ष भावनिक दृष्ट्या खिळखिळ व्हायला लागतो.

वैचारिक स्थिरता आणि rss

Rss and other mother organization..
आज हिंदुत्वाची पोकळी पूर्णतः भाजप ने व्यापली आहे.. हिंदू अस्मिता म्हणजेच भाजप असे समीकरण तयार झाले आहे, आम्ही करतो तेच, हिंदुत्व आम्ही जी बाजू मांडतो तीच बाजू हिंदुत्वाची आहे, असे संकेत आपल्या डोक्यात भाजपने घालून दिले आहेत, जस चीनमध्ये, आणि रशियामध्ये एकच पक्ष सत्तेवर येतो.. तसच काहीतरी भारतात भाजप बाबतीत दिसून येत.. अधिक जवळजाऊन समजून सांगायचं झालं तर दैनंदिन जिवनात अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण राजकारणासोबत जोडल्
जोडयला लागतो, अगदी नकळतपणे ते आपल्याकडून होऊन जातं.. एका ओळीत सांगायचं झालं तर ,धर्मामुळे हा पक्ष जिवंत नाही, तर ,या पक्षामुळे धर्म जिवंत आहे, ही भावना आपल्या मनात भाजप हा पक्ष बिंबवण्यात यशस्वी ठरला आहे.. त्यात अनेक गोष्टी समांतर पातळीवर काम करतात मग त्या समविचारी संघटना असो, rss असो किंवा हुशार आणि चाणाक्ष ज्यांना बर बोलता, येतं, बोललेलं विकता येतं असे लोक हे काम कळत नकळतपणे पक्षासाठी करत असतात.. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सर्व गोष्टी क्षणात झालेल्या नाहीत, त्यासाठी अनेक वर्षे या पक्षाने दिली आहेत.

घराणेशाही आणि अपयशाची जबाबदारी..



Politics is game of perception..राजकारणात देखावा, आणि दिखावा महत्वाचा असतो, आपण ज्याला symbolism म्हणतो, जर देशातील एका प्रमुख पक्षाचा अध्यक्ष गेल्या 20 वर्ष झाले बदलला नाही, तर लोक नक्कीच त्याकडे चौकस नजरेने बघणार.. तुमच्या जिल्हा किंवा तालुका पातळीवर किती तुमच्या

 पक्षात शिस्त किंवा लोकशाही जिवंत आहे, हे बघणार नाहीत.. आणि नेमकं हेच काँग्रेस च्या बाबतीत घडत आहे.. लोकांचा काँग्रेस कडे पाहण्याचा दृष्टिकोन ठराविक होत आहे.. तसा रीतसर प्रचार भाजपकडून केल्या जातो.. या उलट भाजपचे अध्यक्ष दर तीन चार वर्षाला बदलत असतात, ही गोष्ट ती ते प्रकर्षाने मांडतात, आणि त्यातून होत असं की तुमच्या जिल्हा किंवा तालुका पातळीवरील घराणेशाही कोणी बघत नाही.. जर पक्ष निवडणुकीत हरला तर त्याची नैतिक जबाबदारी घेऊन पक्षाध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा देत असतो एवढंच नाही तर का हरलो याचा अहवाल पक्षाला द्यावा लागतो.. याच उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी, व्यंकय्या नायडू,राजनाथ सिंह आणि इतर नेते.. म्हणजे तुम्हाला कोणीतरी जाब विचारेल ही भावना काँग्रेस मध्ये दिसून येत नाही.. याउलट भाजप मध्ये तुम्हाला हिशोब आणि अहवाल दोन्हीही द्यावे लागतात..

पक्ष संघटना आणि मीडियाचा वापर..

Use of social Media by bjp after 2014..
2004 च्या निवडणुकीत या पक्षाने प्रचाराला डिजिटल बोर्ड वापरले होते, कॉल करून सभासद नोंदणी चालू केली होती, डिजिटल जाहीरनामा तयार केला होता.. मग विचार करा तंत्रज्ञान किती चोख या पक्षाने वापरले आहे..2014 च्या आधी आजचा गोदी मीडिया नोएडा मीडिया म्हणून प्रचलित होता.. ते जे ठरवतील तीच दिशा योग्य.. पण भाजपने प्रचंड पैसा ओतून जवळपास 100 कोटी डिजिटल प्रचारात ओतले अनेक खाजगी कंपन्या प्रचारात जुंपून घेतल्या आणि नोएडा मीडियाचे अस्तित्वच खिळखीळ करून टाकले, क्षीण आणि लाचार दिल्लीचे पत्रकार झाले होते..आधी मोदींना देशाचा दुभाजक म्हणणारे आज मोदींना देशाचा तारणहार म्हणत आहेत.. मग विचार करा हा बदल कशामुळे झाला असेल तर.. यावर मला अधिक काही सांगायचे नाही कारण माझा पेशा सुद्धा पत्रकार आहे आणि माझ्या पेशातील लोकांना विकाऊ म्हणून मी लिहलं तर ते योग्य ठरणार नाही. नंतर भाजपतर्फे जगातील सगळ्यात मोठी सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली 2014 साली या पक्षाचे फक्त 5 कोटी सदस्य होते ते 2020 मध्ये जवळपास 20 कोटीच्या घरात गेले आहेत.. आणि भारतात जर निवडणुका जिंकायच्या असतील तर 20 कोटी मतदान पुरेसे आहे.. अनेक मोठे मोठे अभियान आणि कॉल्स मोहीम या पक्षातर्फे राबवण्यात येतात..म्हणजे निवडणुकीच्या 3 महिने हा पक्ष प्रचार करत नाही तर 12 ही महिने election मोड मध्ये राहणारा हा पक्ष आहे..20 कोटी सदस्य नोंदणी असलेला हा जगातील एकमेव पक्ष आहे.. आणि त्याचा परिणाम मतदानावर होत असतो.. 2014 नंतर या पक्षाने समांतर पातळीवर चालणारी चालणारी व्यवस्था निर्माण केली आहे.. खाजगी लोकांना स्थानिक पातळीवर पक्षावर नजर ठेवण्याचे महिन्याला चांगले पैसे दिल्या जातात..(या भागात एवढेच)..

No comments:

Post a Comment

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...