आमचा जाणता राजा आमचे छत्रपती आमच्यासाठी जीव आहेत, मनाच्या आणि बुद्धीच्या कोपऱ्यात ते आजही वावरतात निदान त्यांच्यासाठी तरी आजच्या छत्रपतींनी स्वाभिमान जपणे गरजेचे आहे, महाराष्ट्र हा नेता निवडण्याच्या बाबतीत खूप चिकट आणि धूर्त आहे, नेत्याचा संयम आणि वैचारिक प्रामाणिकपणा व कष्ट करण्याची वृत्ती ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र आधी चाचपडून पाहतो मग त्या नेत्याच्या आणि त्या पक्षाच्या झोळीत भरभरून यश टाकतो.
नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे, सर्वप्रथम तुम्ही माझ मत जाणून घेण्यासाठी इथपर्यन्त आलात त्याबद्दल तुमचे आभार! या ब्लॉगस्पॉटमार्फत मी देशातील राजकीय गोष्टीवरील माझे निरीक्षण आणि त्याच झालेलं माझं आकलन मी याठिकाणी लिहीत असतो. "व्यक्ति तितक्या प्रवृत्ती" या गुणधर्मानुसार, इथे लिहिलेली मते ही सर्वस्वी माझी मते असल्याने ती सर्वाना पटतील असं नाही. पण याठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की येथील मते ही निपक्षपाती आणि सर्वसामान्य लोकांना आकलनात येतील अशी असतील.
Tuesday, May 31, 2022
अपमान गादीचा की महाराजांचा?
खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य बिनदिक्कत उभं केलं असं म्हणतात येणार नाही.. असंख्य अडचणींचा सामना त्यांनी केला, त्यात परकीय लोकांसोबत आपल्या लोकांचा सुद्धा बंदोबस्त त्यांनी केला. त्यामध्ये सर्व जातींचे लोक होते, ब्राम्हण, मराठा आणि इतरसुद्धा, त्याच्यापुढे जाऊन सांगायचे झाले तर मोहिते, जाधव, निंबाळकर जे महाराजांच्या नात्यात होते, त्यांचा बंदोबस्त सुद्धा छत्रपतींनी केला. कारण त्यांचं ध्येय निश्चित होत ते म्हणजे आपल्या लोकांचं राज्य, ज्या राज्यामध्ये आपल्या परंपरा जपल्या जातील, आणि स्वतंत्र कारभार हाकता येईल, हा त्यामागचा शुद्ध हेतू होता. त्यामुळे महाराजांच्या सोबत महाराष्ट्रातील सगळा समाज उभा ठाकला आणि सामाजिक कार्य म्हणून स्वराज्य निर्मितीत सहभाग घेतला. जनतेने महाराज छत्रपती झाले म्हणून त्यांचा सन्मान मुळीच केला नाही, तर एक प्रजासक्त आणि दूरदृष्टी असलेला व्यक्ती छत्रपती होतोय याचा आनंद आणि अभिमान लोकांना होता. छत्रपतींच्या गादीचा आजही आपण सगळे सन्मानच करतो, आणि तो आपण ऋण म्हणून करायलाही पाहिजे. पण एकंदरीतच मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्र धर्माचा जर विचार केला तर शिवाजी महाराजचं छत्रपती या शब्दाची ताकत परिधान करतात, कारण त्यामागे जनभावना होती. आपण जर महाराजांच्या नंतरचा मराठ्यांचा इतिहास तपासला तर त्याची जाणीव आपल्याला होते, मनाच्या कोपऱ्यातून छत्रपती हा आवाज येतो तो फक्त शिवाजी महाराजांसाठीच..आणि तो तिथपर्यंतच जर सीमित राहिला तर ते आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगले आहे.. कारण अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी नेहमीच आपल्या नेत्यांची तुलना महाराजांशी करून त्यांना ठेंगण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जे की महाराजांना सरासरी बनवत असते.. त्यामुळे लोकांची निष्ठा छत्रपती या शब्दावर तेव्हाही होती आणि आत्ताही आहे.. गरज आहे ती त्या भूमिकेत शिरणार्या व्यक्तीची..
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)
Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...
-
देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्...
-
विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो,...
-
2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्या होत्या. निवडणुकीपूर...
No comments:
Post a Comment